बेळगाव : बागलकोट तालुक्यातील कोरवीकोप्प येथे मोठ्या प्रमाणात मुस्लीम बांधव वास्तव्यास आहेत. पण त्यांच्यासाठी स्मशानभूमी नसल्याने नदीकाठावर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. याची दखल घेऊन समाज बांधवानी जागा देण्याची तयारी दर्शविली आहे. यासाठी शासनाने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी हैदरअली मस्जिद कमिटीच्यावतीने करण्यात आली. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. 1970 मध्ये कोरवीकोप्पचा बहुतांश भाग मलप्रभा नदीच्या पाण्याखाली गेला आहे. यामुळे आम्ही सदर भाग सोडून गावात वास्तव्यास आलो. गावात मोठ्या संख्येने मुस्लीम बांधव राहत असले तरी तेव्हापासून आजतागायत शासनाने गावात मुस्लीम समाजासाठी स्मशानभूमीची व्यवस्था केली नाही. यामुळे नदीकाठावर अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. समाज बांधव इब्राहिम बुड्डन्नवर यांनी स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली आहे. यासाठी शासनाकडे जागेसाठी निधी देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी राजासाब सदरखान, बाबसुबान हुच्चन्नवर, अल्हाबक्ष हुच्चन्नवर, माबूसाब सदरखान, एस. ई. सदरखान आदी उपस्थित होते.
Next Article हजारमाचीत मुलाकडून वडिलांवर तलवारीने वार
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









