ऑनलाईन टीम / तरुण भारत :
हवामान खराब असताना कधीही हेलिकॉप्टर उडवू नये, हा जागतिक अलिखित संकेत आहे. काल पायलट नाही म्हणत असताना देखील त्याला आपण बळजबरीने गावी जाण्यासाठी हेलिकॉप्टर उड्डाण घेण्यास सांगितले. असं करणं मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या आणि वैयक्तिक आपल्या दृष्टीनेही चुकीचं होतं. आपण असं का केलं माहित नाही. पण, पुन्हा असं कधीही करु नका, असा सल्ला जितेंद्र आव्हाड यांनी मित्रभावनेने मुख्यमंत्री शिंदेंना दिला.
आव्हाड यांनी मुख्यमंत्री शिंदेंसाठी एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, “मा. मुख्यमंत्री साहेब आपल्यामध्ये राजकीय मतभेद जरूर आहेत. मी हे विसरू शकत नाही की, आपण मुख्यमंत्री होण्यापूर्वी आपले अतिशय जवळचे स्नेहाचे संबंध होते. काल आपण हट्टाने हेलिकॉप्टरचा पायलट नाही म्हणत असताना, त्याला हवामान खराब असल्याचे सांगितले जात असतांना देखील बळजबरीने त्याला गावी जाण्यासाठी हेलिकॉप्टरने उड्डाण घेण्यास सांगितले. आपण हेलिकॉप्टर साताऱ्याला उतरवलं नंतर आपण कुठे गेलात हे मला माहीत नाही.
मा. मुख्यमंत्री साहेब आपल्यामध्ये राजकीय मतभेद जरूर आहेत. मी हे विसरू शकत नाही की, आपण मुख्यमंत्री होण्यापूर्वी आपले अतिशय जवळचे स्नेहाचे संबंध होते.
काल आपण हट्टाने हॅलिकॉप्टरचा पायलट नाही म्हणतं असताना, त्याला हवामान खराब असल्याचे सांगितले जात असतांना देखिल बळजबरीने त्याला…
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) August 11, 2023
पण, हवामान खराब असतांना कधीही हेलिकॉप्टर उडवू नये हे जागतिक अलिखित संकेत आहेत. आपण हे का केलेत ते मला माहित नाही. पण, हे असं करणं महाराष्ट्राच्या दृष्टीने आणि आपल्या वैयक्तिक दृष्टीने चुकीचे आहे. सर सलामत तो पगडी पचास अशी एक म्हण प्रचलित आहे. आपण अशी भूमिका घेणे किंवा असा हट्ट धरणे हे मला वैयक्तिकरित्या पटलेले नाही. कारण कोणी काहिही म्हणो आपण एकेकाळचे चांगले मित्र होतो. ह्या नात्यानेच मी हे लिहीत आहे. असे पुन्हा कधीही करू नका”,असे आव्हाड यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.








