ऑनलाईन टीम / तरुण भारत :
जयपूर-मुंबई एक्स्प्रेसमध्ये गोळीबार करणारा आरपीएफ जवान चेतन सिंह याचे मानसिक संतुलन बिघडले होते. मागील सहा महिन्यांपासून त्याच्यावर मानसिक उपचार सुरू होते. तसेच त्याला निदानाशाचा त्रासही होता, अशी माहिती तपासातून समोर आली आहे. त्यामुळे अशा जवानाला प्रवाशांनी भरलेल्या एक्स्प्रेसमध्ये एस्कॉर्टची जबादारी कशी देण्यात आली? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
जयपूर-मुंबई एक्स्प्रेसमध्ये सोमवारी पहाटे दोन आरपीएफ जवानांमध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्याने त्यामधील चेतन सिंह या जवानाने आपल्या सहकारी जवानांवर अंदाधूंद गोळीबार केला. या गोळीबारात आरपीएफचे एएसआय टीकाराम मीना यांच्यासह अन्य तीन प्रवाशांचा मृत्यू झाला. सोमवारी पहाटे 5.23 च्या सुमारास मीरारोड ते दहिसरदरम्यान ही घटना घडली होती. गोळीबारानंतर चेतन कुमार ट्रेनची ‘चेन पुलिंग’ करुन दहिसरमध्ये उतरला. त्यावेळी पोलिसांनी त्याला अटक केली. तपासादरम्यान, चेतन सिंह याचे मानसिक संतुलन बिघडल्याचे समोर आले आहे. त्याच्यावर मागील सहा महिन्यांपासून त्याच्यावर उपचार सुरू होते. त्यामुळे असे असतानाही या जवानाला ट्रेनमध्ये एस्कॉर्टची जबाबदारी दिल्याने आरपीएफच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.
पाच जणांच्या उच्चस्तरीय कमिटीची स्थापना
या प्रकरणाच्या तपासादरम्यान 5 जणांच्या उच्चस्तरीय कमिटीची स्थापना करण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेचे पी सी सिन्हा, अजोय सधन्य, नरसिन्ह आणि मध्य रेल्वेचे जे पी रावत, प्रभात आणि यांचा कमिटीत समावेश करण्यात आला आहे.








