बेळगाव : केळकरबाग येथील ब्रिटिशकालीन विहिरीचा उपयोग होत नसल्याने या विहिरीतून गोंधळी गल्लीत पाणीपुरवठा करण्यात यावा, यासाठी आवश्यक आराखडा तयार करण्याच्या सूचना शंकर पाटील यांनी एलअँडटी कंपनीच्या अधिकाऱ्यांना शनिवार दि. 21 रोजी केली. केळकरबागेत असलेल्या ब्रिटिशकालीन विहिरीत पाच एचपी विद्युत मोटार बसविण्यात आली आहे. मात्र तेथील पाण्याचा उपयोग होत नसल्याने गोंधळी गल्लीतील मुख्य जलवाहिनीला व्हॉल्व्ह बसवून पाणीपुरवठा करण्यात यावा. जेणेकरून गल्लीतील लोकांना घरकामासाठी पाण्याचा उपयोग करता येईल. यासाठी तातडीने आवश्यक आराखडा तयार करण्याच्या सूचना नगरसेवक शंकर पाटील यांनी एलअँडटीच्या अधिकाऱ्यांना केली.
Previous Articleशेतकरी महिलांना मिळणार मोफत कोंबड्या
Next Article अस्वलांच्या हल्ल्यात ग्रा. पं. सदस्य जखमी
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









