वृत्तसंस्था/ सुहेल (जर्मनी)
आयएसएसएफ कनिष्ठांच्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताच्या स्पर्धकांनी आणखी दोन रौप्यपदके पटकाविली. पुरूष आणि महिलांच्या टॅप सांघिक नेमबाजीत भारताने ही पदके मिळविली.
शुक्रवारी पुरूषांच्या सांघिक ट्रप नेमबाजी प्रकारातील सुवर्णपदकासाठी झालेल्या सामन्यात इटलीने भारताचा 6-4 असा पराभव करत सुवर्णपदक पटकाविले. शार्दुल विहान, आर्या त्यागी आणि विवेन कपूर यांनी भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. महिलांच्या सांघिक ट्रप नेमबाजीत इटलीने भारताचा 6-2 असा पराभव करत सुवर्णपदक मिळविले. या क्रीडाप्रकारात प्रीती रजक, सॅबेरा हॅरीस आणि भव्या त्रिपाठी यांनी भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. या स्पर्धेच्या पदक तक्त्यात आघाडीचे स्थान मिळविताना भारताने आठ सुवर्ण आणि आठ रौप्यपदके मिळविली आहेत. ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका हे संयुक्त दुसऱया स्थानावर असून त्यांनी प्रत्येकी समान एक सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्यपदक पटकाविले आहे.









