बेळगाव : शहरात भटक्या कुत्र्यांची समस्या कायम असून जिकडे तिकडे कुत्र्यांचे कळप फिरत आहेत. त्यामुळे नागरिकांना भीतीच्या छायेखाली वावरण्याची वेळ आली असून कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात महापालिका अपयशी ठरली आहे. गेल्या काही वर्षांपासून शहर व उपनगरात भटक्या कुत्र्यांची समस्या कायम आहे. कुत्र्यांची संख्या वाढू नये यासाठी मादी जातीच्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण केले जात आहे. तरीही विविध ठिकाणी झपाट्याने कुत्र्यांची पैदास वाढत आहे. भटक्या कुत्र्यांच्या कळपाकडून शाळकरी मुलांसह महिलांचा चावा घेतला जात आहे. वारंवार अशा प्रकारच्या घटना घडत असल्या तरी कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात महापालिका अपयशी ठरली आहे. कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यासाठी महापालिकेला ठेकेदार मिळत नसल्याने ही समस्या जैसे थे आहे. जुन्या ठेकेदाराकडून कुत्र्यांचे निर्बिजीकरण केले जात असल्याचे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात कारवाई होत आहे की नाही, हा प्रश्न आहे.
Previous Articleशहरातील धोकादायक झाडांकडे वनखात्याचे दुर्लक्ष
Next Article अखेर ‘त्या’ जखमी गायीची गो-शाळेत रवानगी
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









