बेळगाव : शालेय प्रवेश प्रक्रिया आणि इतर कामांसाठी जात व उत्पन्न दाखल्याची मागणी वाढू लागली आहे. त्यामुळे नेम्मदी केंद्रात नागरिकांची वर्दळ वाढू लागली आहे. शैक्षणिक वर्षाला लवकर प्रारंभ होणार आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेत जात-उत्पन्न दाखला महत्त्वाचा आहे. त्यामुळे जुन्या तहसीलदार कार्यालयातील नेम्मदी केंद्रासमोर गर्दी वाढत आहे. शालेय आणि शासकीय कामांसाठी कागदपत्रे गरजेची आहेत. मात्र आचारसंहितेमुळे काही कागदपत्रांची कामे ठप्प झाली आहेत. तर काही शासकीय कागदपत्रांची पूर्तता केली जात आहे. शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शासकीय कागदपत्रे बंधनकारक आहेत. त्यामध्ये डोमेसियल, जात-उत्पन्नाचा दाखला, राष्ट्रीयत्व, रहिवासी दाखला आदी कागदपत्रे गरजेची आहेत. त्यामुळे नागरिकांची तहसीलदार कार्यालयात गर्दी होवू लागली आहे. नेम्मदी केंद्र, जनस्नेही केंद्र आणि ग्रामवन कार्यालयात शासकीय कागदपत्रांची पूर्तता केली जाते. मात्र सर्व्हर डाऊनची समस्या निर्माण होत असल्याने नागरिकांना ताटकळत थांबावे लागत आहे. शासकीय नोकरी आणि इतर कामांसाठी कागदपत्रे गरजेची आहेत. त्यामुळे तरुण आणि पालकांकडून कागदपत्रांसाठी धडपड सुरू आहे.
Previous Articleप्राचीन वास्तूंच्या संरक्षणाला महत्त्व द्या
Next Article शहरात पाठ्यापुस्तकांच्या वितरणाला प्रारंभ
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









