बेळगाव : अनेक दशकांपासून विकासात मागे पडलेल्या उत्तर कर्नाटकातील जिल्ह्यांमध्ये विमान वाहतुकीशी संबंधित सुविधा उपलब्ध करून द्यावे, अशी विनंती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी केली. गुरुवारी केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यासमवेत सतीश जारकीहोळी यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री किंजरापू राम मोहन नायडू यांची भेट घेऊन वरील मागणी केली. बेंगळूरमधील देवनहळ्ळी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील गर्दीमुळे दुसरे विमानतळ निर्माण करण्यासाठी सर्व तयारी सुरू आहे. तरीही बेंगळुरात लोकसंख्या आणि रहदारी वाढली आहे. त्यामुळे उत्तर कर्नाटकातील हुबळी-धारवाड, बेळगाव आदी जिल्हे विकासाच्या दिशेने वाटचाल करत असून या जिल्ह्या?मध्येही विमानतळांची सुधारणा करावी, अशी विनंती त्यांनी केली आहे. तसेच विमानतळांच्या विकासासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याकडून आवश्यक ते सहकार्य करणार असल्याचेही त्यांनी केंद्रीय मंत्र्यांना सांगितले.
Previous Articleअधिकाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे बैठक पुढे ढकलण्याची नामुष्की
Next Article हद्दवाढीबाबत लवकरच मार्ग निघेल
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









