खानापूर : रिक्षाचालकांनी आपल्या प्रामाणिक सेवेचा लाभ तालुक्यातील जनतेला द्यावा, प्रामाणिकतेचा नावलौकीक व्हावा, रिक्षाचालकांनी आपल्या उन्नतीसाठी सतत प्रयत्नशील रहावे, रिक्षाबरोबरच इतर व्यवसाय करून आर्थिक उन्नती साधावी, असे आवाहन माजी आमदार अरविंद पाटील यांनी नव्या बसस्थानकासमोर बाबासाहेब आंबेडकर ऑटोरिक्षा स्टँडच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिक्षा असोसिएशनचे अध्यक्ष रामचंद्र पाटील होते. नव्याने उभारण्यात आलेल्या बसस्थानकासमोर रिक्षा असोसिएशनच्यावतीने डॉ. बी. आर. आंबेडकर ऑटो रिक्षास्टॅन्डचे उद्घाटन शनिवार दि. 21 रोजी दुपारी 4 वाजता माजी आमदार अरविंद पाटील, भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, भाजपचे ज्येष्ठ नेते संजय कुबल, काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष आय. आर. घाडी, माजी प्राचार्य बसवराज हमण्णावर, लायन्स क्लबचे सागर उप्पीन, पंडित ओगले यांच्या हस्ते करण्यात आले. सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. रिक्षा असोसिएशनच्यावतीने उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. यावेळी गुंडू तोपिनकट्टी, बाबासाहेब देसाई, आगारप्रमुख एम. संतोष, प्रकाश देशपांडे, प्रविण पाटील, राजेश पासळकरसह मान्यवर उपस्थित होते.
Previous Articleबेळगाव- उचगाव-कोवाड मार्गावर कुत्र्यांचा वावर : प्रवाशांत भीती
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









