पालये : गोव्यात पाणी टंचाईची झळ सर्वत्र जाणवू लागली असून पालयेवासियांनाही पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. या भागांतील बहुतांश लोकांच्या पारंपरिक विहिरी आटल्या असून नळजोडणी निकामी ठरल्या आहेत. सरकारची पाणीपुरवठा योजना फोल ठरत असून पाण्याच्या टाकीपासून जवळच असलेल्या देऊळवाड्यावरील लोकंना मात्र पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. सध्या या भागात चार-पाच दिवसांनी टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असून चार दिवसांसाठी पुरेल इतके पाणी एकाचवेळी टॅंकरद्वारे पुरवले जाऊ शकते का, असा सवाल करण्यात येत आहे. लोकांना टँकरसाठीही दिवसभर वाट पाहात राहावी लागते. टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा पुरेशा प्रमाणात करण्यात येईल, याची खबरदारी खात्याने घ्यावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
Next Article भूषण नाईक यांचे राजकीय, सामाजिक क्षेत्रात योगदान
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









