सावंतवाडी पत्रकार संघ आणि अर्चना फाउंडेशनचा पुढाकार
ओटवणे प्रतिनिधी
सात युवकांनी स्वता:चा जीव धोक्यात घालून तेही रात्रीच्यावेळी पुराच्या पाण्यातून पर्यटकांसह त्यांच्या वाहनांना सुरक्षित बाहेर कादून केलेलं कार्य कौतुकास्पद आहे. कोकणच्या ‘अतिथी देवो भव’ या संस्कृतीनुसार हे युवक संकंटात देवदूत बनले. शासनाने त्यांच्या या कार्याची दखल घेणं गरजेचे होते. परंतु बाळशास्त्रीं जांभेकर यांचा आदर्श ठेवून कार्यरत असणाऱ्या पत्रकार संघाने या युवकांच्या धाडसी कार्याची दखल घेतली त्यामुळे या देवदूत युवकांसह संवेदनशील पत्रकार संघाचा आम्हाला अभिमान आहे असे प्रतिपादन अर्चना फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. अर्चना घारे-परब यांनी केले.
सावंतवाडी तालुका पत्रकार संघ आणि अर्चना फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सरमळे येथे तेरेखोल नदीच्या पुराच्या पाण्यात अडकलेल्या पर्यटकांना सुखरूप बाहेर काढणाऱ्या त्या ७ धाडसी युवकांच्या सन्मान सोहळ्यात
सौ. अर्चना घारे-परब बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर शासनाच्या पत्रकार अधिस्वीकृती समितीचे सदस्य गजानन नाईक, सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, सोशल मिडिया जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, सरमळे सरपंच विजय गावडे, उपसरपंच दिपांकर गावडे, माजी उपसरपंच समीर माधव, ग्रामपंचायत सदस्य राजन कांबळे, भजनी बुवा संजय गावडे, मालवणी कवी रामदास पारकर, सौ एकता दळवी, नाना काटाळे, विजय गावडे आदी उपस्थित होते.
यावेळी बांदा-दाणोली या जिल्हा मार्गावरील सरमळे येथे तेरेखोल नदीतील पुराच्या पाण्यात अडकलेल्या पर्यटकांसह दोन वाहनांना सुखरूप बाहेर काढणाऱ्या संजय सावंत, विश्वजीत गावडे, संजय गावडे, रजत देसाई, अक्षय तळवडेकर (सर्व सरमळे), एकनाथ दळवी (विलवडे), संजय गावकर (ओटवणे) या सात युवकांचा शाल सन्मान पत्र देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार गजानन नाईक यानी संकटं काळात जो धावून येतो तो आपला असतो. गेल्या काही वर्षांत कोकणात मोठ्या आपत्ती निर्माण होत असुन अशी परिस्थिती कोकणात यापूर्वी नव्हती. अशा प्रसंगी जे मदतीला धावून जातात ते देवदूतच आहेत. प्रत्येक गावात असे युवक असतात. त्यामुळे निधड्या छातीच्या तरुणांच्या सन्मानाचा कौतुकास्पद असुन अशा युवकांना आपत्ती व्यवस्थापन कक्षात त्यांना सामावून घेऊन त्यांना प्रशिक्षण देण्यासह साधन सामुग्री उपलब्ध करून देण्यासाठी पत्रकार संघ म्हणून आम्ही प्रयत्न करू याची असं ग्वाही दिली.
यावेळी उपसरपंच दिपांकर गावडे यांनी आमच्या ७ धाडसी युवकांमुळे आठ जणांचे जीव वाचले. शासनाने याची दखल घेतली नाही पण पत्रकार संघ आणि अर्चना फाउंडेशनन त्याची दखल घेत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. हे आमच्यासाठी अभिमानास्पद असल्याचे सांगितले. यावेळी विश्वजीत गावडे आणि अक्षय तळवडेकर या धाडसी युवकांनी आपलं मनोगत व्यक्त करताना त्या प्रसंगाचा थरार कथन केला. अणि आणि आपल्या या कार्याची दखल घेतल्याबद्दल तालुका पत्रकार संघ आणि अर्चना फाउंडेशनचे आभार मानले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार यांनी तर सूत्रसंचालन व आभार लूमा जाधव यांनी मानले. यावेळी पत्रकार संघाचे सचिव मयुर चराठकर, उपाध्यक्ष दीपक गांवकर, सहसचिव विनायक गांवस, सदस्य राजू तावडे, मंगल कमत, नरेंद्र देशपांडे, मोहन जाधव, सचिन रेडकर,रूपेश हिराप, निलेश परब, शैलेश मयेकर, आनंद धोंड, साबाजी परब, भुवन नाईक, अजित दळवी, अर्चना फाउंडेशनचे वैभव परब, आकाश पांढरे आदी उपस्थित होते.









