बेळगाव : पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली औद्योगिक वसाहतीसाठी हिडकल जलाशयातील पाणी हुबळी धारवाड शहराला नेले जात आहे. त्यामुळे बेळगावला पिण्याच्या पाण्याच्या समस्येसह शेतीसाठी पाणी कमी पडण्याचा धोका आहे. राजकारणी बेळगावकरांची दिशाभूल करून पाणी नेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर भीमगड अभयारण्य वाचविण्यासाठी मंगळवार दि. 3 रोजी सकाळी 10 वा. सर्वांनी पक्ष, भाषा, जात, भेद न बाळगता सरदार्स हायस्कूल मैदानावर जमावे, तेथून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली जाणार आहे, असे समाज सेवक सुजित मुळगुंद, राजू टोपण्णावर, अॅड. नितीन बोलबंडी यांनी पत्रकार परिषदेत केले.
Previous Articleलॅपटॉप टेंडर, थर्ड पार्टी परीक्षणाची माहिती द्या
Next Article सीएल-07 शुल्कवाढीचा पुनर्विचार करावा
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









