बेळगाव : वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसाचा मोठा फटका हेस्कॉमला बसला असतो. ग्रामीण भागात अवकाळी पावसामुळे लाखो रुपयांचे नुकसान होते. विद्युत वाहिन्या तुटणे, वीजखांब पडणे, ट्रान्स्फॉर्मर निकामी होणे असे प्रकार सर्रास घडत असतात. नुकतीच कडोली भागात पडलेल्या दमदार पावसामुळे अनेक झाडे कोसळली आहेत तर हेस्कॉमचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे परिसरात विजेचा खेळखंडोबा सुरू असल्याचे दिसून येत आहे. वळिवाच्या पावसामुळे बेळगाव जिह्याला देखील फटका बसला. वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार झोडपल्याने हेस्कॉमचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. खानापूर, बेळगाव ग्रामीण या भागात सर्वाधिक फटका बसला असतो. त्यामुळे धोकादायक झाडे हटविणे किंवा इतर कामे करण्यावर भर देण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे आता याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे. पावसामुळे नुकसान होण्यापूर्वीच त्याची तयारी करणे गरजेचे आहे. कडोली भागात मोठ्या प्रमाणात झाडे पडली आहेत. तर काही ठिकाणी खांबही पडले आहेत. याचा फटका बसला तरी उष्मा मात्र कायम आहे. पावसाळा जवळ येवूनही हेस्कॉमने अद्याप तयारी केलेली दिसत नाही. त्यामुळे वादळी वाऱ्याचा फटका बसताच हेस्कॉमचे सर्व नियोजन कोलमडले. मोडलेले विद्युतखांब बाजुला करून त्या ठिकाण नवे विद्युतखांब बसविण्याचे काम प्रगतीपथावर करण्यात येते. मात्र अधिकाऱ्यांची धावपळ व इतर समस्यांमुळे नाराजीचा सूर उमटत आहे. तेंव्हा आतातरी हेस्कॉमने गांभीर्याने घेणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









