रांची : भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी यांनी हेमंत सोरेन यांच्या सरकारवर टीका केली आहे. राज्यात हेमंत सोरेन यांचे सरकार आल्यापासून मोठ्या प्रमाणात लूट सुरू आहे. मुख्यमंत्री सोरेन हे आदिवासींनाच लूटत असल्याचा आरोप मरांडी यांनी केला आहे. राज्यातील घोटाळ्यांप्रकरणी केंद्रीय तपास यंत्रणांनी अनेकांना तुरुंगात डांबले आहे. अत्यंत लवकरच हेमंत सोरेन देखील तुरुंगात जाणार असल्याचे मरांडी यांनी म्हटले आहे. मरांडी यांच्या हस्ते सिदो कान्हू यांचे जन्मस्थळ भोगनाडीह येथून राज्यस्तरीय संकल्प यात्रेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. यात्रेदरम्यान हेमंत सोरेन सरकारला पायउतार करविण्याचा संकल्प जनता घेणार आहे. सिदो कान्हू यांनी इंग्रजांच्या विरोधात लढताना हौतात्म्य पत्करले होते. त्यांच्या बलिदानामुळेच देश स्वतंत्र झाला. स्वातंत्र्यानंतर भाजपने वेगळ्या राज्यासाठी लढा दिला आणि 15 नोव्हेंबर 2000 रोजी नव्या झारखंड राज्याची निर्मिती झाली, परंतु अलिकडच्या काळात झारखंडमधील घोटाळे पूर्ण देशाने पाहिले आहेत. पुन्हा एकदा भ्रष्ट राज्य सरकारपासून मुक्ती मिळविण्यासाठी लोकांनी संकल्पबद्ध होण्याची गरज असल्याचे मरांडी यांनी म्हटले आहे.
Previous Articleगुरुवारच्या सत्रात शेअरबाजारात पडझड
Next Article ‘विक्रम’ लँडर यशस्वीपणे विभक्त!
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









