खानापूर : हेब्बाळ परिसरातील शेतीवाडीला पाणी देण्यासाठी हेब्बाळ जलाशय निर्माण करण्यात आले आहे. पावसाळ्यात या जलाशयात मोठ्या प्रमाणात पाणी भरते. परंतु गेल्या दहा वर्षापासून जलाशयातील पाणी शेतीला सोडणारे गेट नादुऊस्त झाल्यामुळे शेतीला पाणी मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे ऊस व भात पीक सुकून जात आहे. यामुळे शेतकरी वर्गात संताप व्यक्त करण्यात येत आहे. नंदगडच्या पश्चिमेला व हेब्बाळ गावच्या दक्षिणेला एकीकडे डोंगर दुसरीकडे राज्यमार्ग उर्वरित दोन्ही बाजूला शेतीवाडी अशी नैसर्गिक रचना असलेल्या जागेत हेब्बाळ जलाशयाची चाळीस वर्षांपूर्वी निर्मिती करण्यात आली आहे. शिवाय कालवेही उत्तमरीत्या बनविण्यात आले आहेत. परंतु येथील दोन्ही गेट नादुऊस्त झाली आहेत. ही दोन्ही गेट दुऊस्ती करण्यासाठी वारंवार या भागातील शेतकऱ्यांनी लघुपाटबंधारे खात्याकडे विनंती केली. प्रसंगी आंदोलन केले, पण याकडे गेल्या दहा वर्षात दुर्लक्षच केले गेले. अधिकाऱ्यांकडून गेट दुऊस्तीसाठी निधी नसल्याचे कारण सांगण्यात येते. गेल्या कित्येक वर्षापासून जलाशयाच्या खाली असलेल्या शेतवडीत ऊस व भातपीक पिकविण्यात येते. जानेवारी महिन्यानंतर मे अखेरपर्यंत शेतकरी वर्ग जलाशयाच्या बांधावरून पाईप टाकून मिळेल तेवढे पाणी घेण्याचे प्रयत्न करतात. हा संघर्ष गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. परंतु हे करण्यासाठी मनुष्यबळाची रोज गरज भासते. यावषी जून महिनाही पावसाविना गेला. त्यामुळे पुन्हा शेतकऱ्यांच्या त्रासात भर पडली आहे. आजपर्यंतही शेतकरी पाईप टाकून पाणी खेचण्याचाच प्रयत्न करत आहेत. यावषी तरी शेतकऱ्यांचे त्रास पाहून संबंधित खात्याकडून या गेटची दुऊस्ती होणार काय, असाच प्रश्न शेतकऱ्यांकडून केला जात आहे.
Previous Articleखानापुरात गृहज्योती योजनेचा शुभारंभ
Next Article पिरनवाडी रामदेव गल्लीतील गटारीची सफाई करणार कोण?
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









