सांगली : आज, मंगळवारी पहाटेपासून झालेल्या पावसामुळे द्राक्ष बागांना मोठा फटका बसल्याची भीती व्यक्त केली जात आहे. संततधार पावसाचा रब्बी पिकांना मात्र फायदा झाला आहे. मिरज तालुक्यात सर्वाधिक २४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी १२.५ मिलीमीटर पाऊस झाला आहे.
मंगळवारी पहाटेपासून मेघगर्जनेसह जिल्ह्यातील सर्व तालुक्यात संततधार पाऊस कोसळल्यामुळे ओढे-नाले पावसाने भरून वाहत होते. अनेक तलाव तुडुंब भरले आहेत. सखल भागातही पाणी साचून राहिल्यामुळे द्राक्षबागांना सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे.
मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या २४ तासांत मिरज तालुक्यात सर्वाधिक २४ मिलीमीटर तर वाळवा तालुक्यात १९.६ मिलीमीटर पाऊस झाला आहे. खानापूर तालुक्यात ४.६ मिलीमीटर, तासगाव १५.१, शिराळा ३.९, आटपाडी १.४, कवठेमहांकाळ ६.९, पलूस ८.७ आणि कडेगाव तालुक्यात ३.४ मिलीमीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्याच्या सर्व तालुक्यांत पावसाने हजेरी लावली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








