बेळगाव : पावसाने परतीची वाट धरली असे वाटत असतानाच गुरुवारी पुन्हा पावसाने हजेरी लावली. हवामान खात्याने पुन्हा पावसाची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवला होता. आणि आश्चर्य म्हणजे तो अचूक ठरला. गुरुवारी संध्याकाळी आभाळात ढग दाटून आलेच होते, आणि साधारण साडेआठनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या या पावसाने लोकांची मात्र तारांबळ उडाली. पावसाचा कोणताही अंदाज नसल्याने भाजी विक्रेत्यांची पावसापासून भाजी वाचवताना पुरेवाट झाली. पावसाचा अंदाज लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी लवकरात लवकर मळणी पूर्ण करण्यासाठी धडपड चालवली होती. आता पावसाने खरोखरच परतीची वाट धरावी, अशी विनवणी बळीराजासह सर्वजण करत आहेत.
Previous Articleघरकुल प्रदर्शनाला मोजकेच दिवस शिल्लक
Next Article इलेक्शन फिवर; रोज 3 टन मटनाचा फडशा…
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









