नंदगड : नंदगड क्रॉसपासून गावात जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला असलेल्या गटारीत पोत्यातून व पिशवीतून कचरा आणून टाकण्यात आला आहे. त्यामुळे हा कचरा पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यास अडचणीचा ठरणार आहे. खानापूर तालगुप्पा राज्य मार्गावरील नंदगड कत्रीपासून गावातून हलशीमार्गे नागरगाळीला रस्ता जातो. नंदगड कत्रीपासून गावात जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला असलेल्या गटारीत पोत्यातून, पिशवीतून आणलेला कचरा टाकण्यात आला आहे. त्यामध्ये कपडे, प्लास्टिक व काचेच्या बाटल्या व अन्य साहित्य आहे. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या गटारी स्वच्छ होत्या. फेब्रुवारीमध्ये नंदगड गावची लक्ष्मी यात्रा असल्याने गटारीची खोलबंदी आणि स्वच्छता करण्यात आली होती. यामुळे नंदगड गावच्या सौंदर्यात काहीअंशी भर पडली होती. अवघे तीन महिनेही लोटले नाहीत तोच काही अज्ञातांनी रस्त्याच्या पश्चिमेकडे असलेल्या गटारीत कचरा टाकला आहे. आगामी पावसाळा आठवड्यावर येऊन ठेपला आहे. गटारीत कचरा टाकल्याने पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण होणार आहे.
Previous Articleस्थलांतर नको, सुविधा पुरवण्याची मागणी
Next Article कणबर्गी मराठी शाळेच्या गेटसमोर गतिरोधक बसविले
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









