हरमल : पेडणे तालुक्यातील हरमल मिरचीला ’जीआय’ भौगोलिक मानांकन मिळाल्याने मिरची उत्पादक शेतकरी खुष होते. गेल्या अनेक वर्षात मिरचीचे उत्पादन व दर, याची सांगड जुळवून घेण्यात शेतकरी व्यस्त होता. किमान फायदा व्हावा यासाठी शेतकरी काबाडकष्ट करीत असतो, मात्र जीआय मानांकन मिळाले व उत्पादनच कमी होणे उचित नसल्याचे चित्र आहे. सध्याच्या कमी उत्पादनात पाणी टंचाई प्रमुख अडसर ठरला आहे. देऊळवाडा, वरचा वाडा. दोन्ही वाड्यावर साधारणपणे तीन चार क्विंटल मिरची उत्पादन घेण्राया शेतक्रयांना यंदाचा मोसम फारच खराब झाला. एरव्ही पाणी उपलब्धता मोठ्या प्रमाणात नसली तरी टंचाई कधीच झाली नव्हती, मात्र सध्या परंपरागत ओहोळाला पाणीच नसल्याने मिरचीचे पीक धोक्यात आले आहे. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे, असे एका शेतक्रयांने सांगितले. देऊळवाडा भागांतील शेतकरी पाण्याच्या उपलब्धततेमुळे पाच दिवसाने मिरचीला शिंपण करीत असल्याने शेतक्रयांनी चिंता व्यक्त केली. मिरचीला शिंपण दरदिनी असणे आवश्यक असते,मात्र पाणी टंचाईच्या कारणाने मिरचीची झाडे वाळली असल्याचे शेतकरी सुकेश नाईक यांनी सांगितले. सरकार लोकवस्तीतील पाणी टंचाईची दखल घेतो,मात्र शेतक्रयांना दिलासा देण्यासाठी सरकार काय पावले उचलणार असा प्रश्न एका शेतकरी महिलेने उपस्थित केला.शेती उत्पादन घेण्याची क्षमता व आवड असूनही सध्या पाण्याच्या टंचाईमुळे मिरचीची झाडे वाळली आहेत, सुकून गेल्याने मनाला फार वेदना होत असल्याचे शेतकरी महिलेने सांगितले.
Previous Articleसांखळी बाजारातील काँग्रेस कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश
Next Article सहकार क्षेत्रात व्हीपीके अर्बनची गरूडभरारी झेप
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









