पणजी : राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यातील लोकांना दसऱ्याच्या शुभप्रसंगी हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. आपल्या संदेशात राज्यपाल म्हणतात, दसारा आपल्या राष्ट्रीय एकात्मतेला बळकट करतो आणि विविधतेतील एकता या संकल्पनेवरील आपला अढळ विश्वास दृढ करतो. हा दसरा गोव्यातील जनतेला अधिकाधिक समृद्धी आणि शांती घेऊन येवो, असेही राज्यपालांनी म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे की, प्रभू श्रीरामाने रावणावर मिळविलेल्या विजयाचा दिवस साजरा करण्यासाठी व माता दुर्गादेवीने महिषासुराला मारून वाईट शक्तींशी लढा देऊन मिळविलेला विजय म्हणून हा दिवस दसरोत्सव म्हणून साजरा केला जातो. आपण सर्वजण मिळून गोव्याला समृद्ध राज्य करुया, असेही म्हटले आहे.
Previous Articleआता न्यायालयच निर्णय देणार
Next Article सिद्धिकीच्या बांधकामांवर बुलडोझर
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








