बेळगाव : हलगा-मच्छे बायपास खटल्याची सुनावणी अंतिम टप्प्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच शेतकऱ्यांच्या बाजूने युक्तिवाद करणाऱ्या वकिलांचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. त्यामुळे या खटल्याचा निकाल यापूर्वीच लागणार होता. मात्र तो पुढे ढकलण्यात आला. बुधवार दि. 5 रोजी या खटल्याचा निकाल लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हजर रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. न्यायालयामध्ये कंत्राटदाराने स्थगितीचा आदेश हटवावा आणि आम्हाला रस्ता करण्यास मुभा द्यावी, असे सांगितले होते. या रस्त्यासाठी आता कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आले आहेत. त्यामुळे मोठे नुकसान होणार आहे, असे न्यायालयात स्पष्ट केले. मात्र त्याविरोधात शेतकऱ्यांचे वकील रवीकुमार गोकाककर यांनी शेतकऱ्यांची बाजू भक्कमपणे मांडली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
Previous Articleहुश्श… एका बाजूचा झाला; दुसऱ्या बाजूचा कधी?
Next Article निवडणुकीच्या कामासाठी धावणार बसेस
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









