बेळगाव : सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी काँग्रेस कार्यालयात नागरिकांकडून तक्रारी अर्ज स्वीकारून समस्या सोडविण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली. गावातील पाणीटंचाई, मंदिराच्या बांधकामांठी आर्थिक मदत, रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी अनुदान, शाळेसाठी शैक्षणिक साहित्य, वीज जोडणी, तालुका पंचायतीमधून नागरिकांना उद्भवणाऱ्या समस्या यासंबंधीचे अर्ज जिल्ह्याच्या विविध भागातून आलेल्या नागरिकांनी सादर केले. पालकमंत्र्यांनी समस्या जाणून घेत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. जटिल समस्य़ांसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून मदत घ्यावी, अशीही सूचना केली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी, मुख्य सचिव प्रदीप एम. जे., बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळी, पक्षनेते सुनील हनमण्णवर, सय्यद मन्सूर, मंत्री जारकीहोळी यांचे स्वीय साहाय्यक मलगौडा पाटील आदी यावेळी उपस्थित होते.
Previous Articleजि. पं. सीईओंची परीक्षा केंद्रांना भेट
Next Article नव्या नियमावलीमुळे वीज मीटरच्या संख्येत घट
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









