पणजी : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी परिषदेची 56वी बैठक नवी दिली येथे घेण्यात आली. बैठकीत सीतारमण यांनी जीएसटी कर दरांमध्ये बदल करून सामान्य व्यक्ती आणि मध्यमवर्गांना दिलासा दिला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. नवी दिल्ली येथील जीएसटी परिषदेच्या बैठकीला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी उपस्थित राहून अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर अर्थमंत्री सीतारमण यांच्याशी चर्चा केली. ही बैठक सुषमा स्वराज भवन येथे पार पडली. देशातील इतर राज्यांचे प्रतिनिधीही उपस्थित होते. या बैठकीत शंकांचे निरसन करण्यासाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न देखील उपस्थित करण्यात आले. त्यानंतर जीएसटी परिषदेने काही शिफारशी केल्या असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
Previous Articleरेल्वे दुपरीकरण प्रकल्पाचा डीपीआर काँग्रेसचा : ढवळीकर
Next Article कोल्हापूरकरांनी पुन्हा एकदा करून दाखवलं!
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









