पणजी : आयटीआय अभ्यासक्रमांना सरकार प्रोत्साहन देत असून दहावीनंतर दोन वर्षाचा कोर्स केल्यास तो यापुढे बारावीच्या बरोबरीचा समकक्ष समजण्यात येणार असून मुरगाव तालुक्यातील उच्च माध्यमिक शाळांचे सर्वेक्षण केले जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत दिली. गरज भासली तर तुकड्या वाढवण्यावर विचार करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले. आमदार संकल्प आमोणकर यांनी मुरगाव मतदारसंघातील उच्च माध्यमिक शाळा आणि तेथील प्रवेशाचा प्रश्न मांडला होता. तेथे प्रवेश मिळत नसल्याने मुलांना 10 ते 15 किमी लांब असलेल्या दुसऱ्या उ. मा. शाळेत जावे लागते येथे जाण्या येण्यास दोन-तीन बसेस बदलाव्या लागतात आणि दोन-तीन तास वाया जातात अशी व्यथा त्यांनी मांडली. त्यावर उत्तर देताना डॉ. सावंत म्हणाले की, उ. मा. शाळा मतदारसंघानिहाय देण्यात येत नाहीत, तर मागणीनुसार दिल्या जातात. त्यावेळी मुलांचा विचार करावा लागतो. मुरगांव तालुक्यात एकूण 7 ते 8 उ. मा. शाळा आहेत. तेथील मुलांची संख्या कमी जास्त असून कोणालाही प्रवेश नाकारण्यात आलेला नाही. प्रवेशाचा प्रश्नही निर्माण झाला नाही, असे डॉ. सावंत यांनी नमूद केले. दहावीनंतर आयटीआयमध्ये चांगला वाव असून तेथील कोर्स, साधनसुविधा, जागा वाढवण्यात येणार आहेत. दहावी नंतर दोन वर्षाचा आयटीआय कोर्स केल्यानंतर हवे असल्यास बीए, बीकॉम शिक्षण पूर्ण करण्यास मिळेल. सरकारी तंत्रनिकेतनात आयटीआय विद्यर्थ्यांसाठी जागा वाढवल्या जातील. नवीन शैक्षणिक धोरणानुसार हे बदल करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
Previous Articleकारे महाविद्यालयातील 180 विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द
Next Article नगरविकास सचिवांकडून सोनसड्यावर पाहणी
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









