बेळगाव : शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे. दोन दिवसांपूर्वी सदाशिवनगर येथे 9 वर्षीय बालिकेवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. यामध्ये ती गंभीर जखमी झाली. त्यामुळे आता तरी भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त मनपाकडून केला जाणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दुसरा मेन क्रॉस, सहावा क्रॉस सदाशिवनगर येथील धनिषा पुंडलिक पाटील या मुलीवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. सायंकाळी घराजवळ खेळत असताना कुत्र्यांनी हल्ला केल्याने बालिकेच्या पाय व हातावर जखमा झाल्या होत्या. यापूर्वी रेल्वेस्टेशनसमोरील बसस्थानकातही भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याने सहा ते सात नागरिक जखमी झाले होते. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी मनपाने मोहीम राबविणे गरजेची आहे. केवळ डोळेझाक करण्यासाठी मोहीम न उघडता भटक्या कुत्र्यांना पकडून इतरत्र सोडणे गरजेचे आहे. याबरोबरच निर्बिजीकरण करणेही गरजेचे झाले आहे.
Previous Articleविद्यार्थ्यांनी बनविलेल्या दिवाळी साहित्याचे प्रदर्शन
Next Article शेतकऱ्यांची धाव… आयुक्तांचा काढता पाय
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









