बेळगाव : शहरातील कचऱ्याची वेळेवर उचल न होणे ही नेहमीचीच समस्या आहे. कचरा उचल करणाऱ्या वाहनांची अनियमितता कायमची झाली आहे. त्यातच कचरा उचल करणारी वाहने कोठेही ठेवण्यात येत आहेत. शेट्टी गल्लीच्या कॉर्नरवर कचरा उचल करणाऱ्या पत्र्याच्या तीन-चार गाड्या तशाच पडून आहेत. या गाड्या येथे कोणी ठेवल्या? त्यांचा वापर कचरा उचल करण्यासाठी का केला जात नाही? या प्रश्नांची उत्तरे नाहीत. या गाड्यांमधील कचरा मोठ्या कचरा कुंडांमध्ये न टाकता कचऱ्यासह त्या गाड्या तशाच ठेवण्यात आल्या आहेत. पावसाची रिमझिम सुरू असल्याने त्यातील कचऱ्यावर पाणी पडून त्याला दुर्गंधी सुटली आहे. कोरोनाचा शिरकाव झाल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि महानगरपालिका स्वच्छता राखण्याचे आवाहन करत आहे, पण ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण’ यानुसार मनपाच कचऱ्याची उचल करण्यामध्ये असमर्थ ठरत आहे. शेट्टी गल्लीच्या कॉर्नरवर दिसणारे हे चित्र शहरातील अनेक ठिकाणी पहायला मिळते. सद्यपरिस्थितीत कचरा उघड्यावर टाकणे हे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे शहरात कचरा गाडीमधील कचऱ्याची योग्य विल्हेवाट होईल व परिसर स्वच्छ राहील यावर महानगरपालिकेने भर देण्याची गरज आहे.
Previous Articleपावसाची उघडीप ; आठ बंधारे पाण्याखाली
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









