धारबांदोडा : ग्रामिण भागाच्या विकासाच्या प्रवाहात गोमंतकीय शेकडो वर्षे परांपरागत लाभलेली आंबे, फणसाच्या प्रजाती लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. अशावेळी आपल्या भावी पिढीसाठी बियाणे व रोपांचे जतन होणे अपरिहार्य आहे असे मत मर्दनगड अभियानाचे प्रमुख निलेश नाईक यांनी दयानंदनगर धारबांदोडा येथील वनमहोत्सव कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना काढले. वनखाते व सरकारी प्राथमिक शाळेने संयुक्तपणे आयोजित कार्यक्रमात वन खात्याचे क्षेत्रीय वन अधिकारी रमाकांत नाईक, नर्सरीचे प्रमुख देऊ शेटकर, पंचसदस्य कविता गावकर, पालक शिक्षक संघाचे रमेश गावकर, किरण साळगांवकर आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यानी गायिलेल्या निसर्ग गाण्याने व निलेश नाईक यांच्याहस्ते दिप प्रज्ज्वलन करून वनमहोत्सवाला प्रारंभ झाला. मान्यवरांच्याहस्ते शाळेच्या संकुलात झाडांची रोपे लावण्यात आली. त्यानंतर पालकांना रोपांचे वाटप करण्यात आले. वनिता सुलेभाविक यांनी स्वागत व पाहुण्याचा परिचय केला. विद्यार्थीनी कु. विधी पोतदार हिने पर्यावरणाविषयी माहिती देणारे भाषण दिले. देऊ शेटकर यांनी रोपांच्या लागवणीविषयी माहिती दिली. निकीता गावकर हिने सुत्रसंचालन केले. शिक्षिका विधी आमाडकर हिने आभार मानले.
Previous Articleमुरगांव हायस्कुलच्या विद्यार्थी मंडळाचा अधिकारग्रहण सोहळा
Next Article सम्राट क्लब उसगांवतर्फे रंगभूमीदिन साजरा
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









