सातारा :
बाई तालुक्यातील बाबधन नाका हे ठिकाण अलीकडच्या काळात भांडण, मारामाऱ्या यासाठी चर्चेत येऊ लागले आहे. सोमवारी रात्री ९ वाजता भर पावसात काही युवक बावधन नाका परिसरात जमले. काही कळायच्या आता फिल्मी स्टाईलने हाणामारी सुरू झाली. रस्त्यावर दोन्ही बाजूची वाहतूक थांबली होती. या घटनेची माहिती मिळताच बाई पोलीस ऑन दि स्पॉट पोहचले. तो पर्यंत रस्त्यावर मध्ये पाडून चांगलीच फायटिंग सुरू झाल्याने बावधन नाका म्हणजे बीड बनलाय का? असा सवाल समस्त वाईकराना पडू लागला आहे.
बाई येथील बावधन नाका परिसरात सोमवारी रात्री ९ वाजता काही युबक मोठ्या संख्येने जमले होते. काहीतरी घटना घडणार असे कळायच्या आतच त्यात आणखी काही युवक मिसळले आणि फायटिंगला सुरू झाली. बघता बघता धुवाधुवी सुरू झाली. जोरावर फायटिंग सुरू झाल्याने बाई स्टैंडकडे जाणारी आणि बाईकडून सह्याद्रीनगरकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली. बघ्यांची गर्दी वाढली. पावसात ही फायटिंग सुरू असताना बघ्यातील कोणीतरी बाई पोलिसांना फोन फिरवला. अन पोलिसांची गाडी ऑ न दि स्पॉट पोहचली. बाई पोलीस घटनास्थळी पोहचल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. हाणामारी थांबली. मात्र, या प्रकारामुळे वाईचा बावधन नाका पुन्हा चर्चेत आला.
नेमकी भांडण करणारे कोण होते?, भांडण कशावरून झाले?, बावधन नाका बाईचा बीड होतोय की काय?, अशी बघ्यांमध्ये चर्चा सुरू होती. यापूर्वी ही अनेक घटना बावधन नाका परिसरात घडल्या होत्या. त्यावरून वाईकरांनी मोर्चाही काढला होता. परंतु पुन्हा हा नाका चर्चेत आला आहे.
- पोलीस दप्तरी नोंद झाली काय?
या घटनेची माहिती घेण्यासाठी बाई पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे या घटनेत नेमकी हाणामारी कशावरुन झाली, हाणामारी करणारे दोन्ही गट कोणत्या गावचे होते, त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली काय हे मात्र समजू शकले नाही.








