बेळगाव : हिडकल जलाशयाचे पाणी हुबळी-धारवाड येथील औद्योगिक वसाहतीसाठी नेण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु यामुळे भविष्यात शेतीसाठी पाणी अपुरे पडू शकते. औद्योगिक वसाहतीलाच पाणीपुरवठा करायचा असेल तर बेळगावमध्ये नवी औद्योगिक वसाहत सुरू करावी व पाणीपुरवठा करावा, अशी मागणी रयत संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. कॅनॉल रुंदीकरणासाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यापूर्वी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत आपल्या मागण्या मांडल्या. हुबळी-धारवाड औद्योगिक वसाहतीसाठी पाणी नेल्यास या विरोधात तीव्र आंदोलन करू असा इशारा शेतकऱ्यांनी दिला. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्याविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. यावेळी बोलताना शेतकरी संघटनेचे अध्यक्ष चुनाप्पा पुजारी म्हणाले, हिडकलच्या पाण्यावर बेळगावच्या शेतकऱ्यांचा हक्क आहे. त्यामुळे हे पाणी हुबळी-धारवाडसाठी दिले जाणार नाही. राज्य सरकारने हा प्रकल्प तात्काळ मागे घ्यावा अन्यथा भविष्यात याचे परिणाम सरकारला सोसावे लागतील असा इशारा त्यांनी दिला.
Previous Articleमलप्रभा जलाशयातून कालव्यांद्वारे 1 मार्चपर्यंत पाणी
Next Article बहरलेला चाफा आणि सजलेली शिवजयंती
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









