शाहुवाडी प्रतिनिधी
शाहूवाडी तालुक्यात . दुपारी अचानक पावसाने वादळी वाऱ्यासह सुरवात केली. अचानक आलेल्या पावसामुळे रेठरे ( ता . शाहूवाडी ) येथील शेतकरी बापूराव बापू जाधव ( वय ६१ ) हे गवताच्या होळी झाकत असताना अचानक त्यांच्या अंगावर वीज पडून जागीच ठार झाले. या घटनेमुळे रेठरे गावात गरीब शेतकरयांच्या मुत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे.
रेठरे येथील शेतकरी बापूराव जाधव यांनी जनावरासाठी घराच्या पाठीमागे गवताची होळी रचून ठेवली होती. अचानक शुक्रवार दि ७ रोजी पावसाने सुरवात केली म्हणून घरातील प्लॅस्टिक कागद घेऊन होळीवर झाकण्यासाठी गेले. कागद होळीवर झाकत असताना अचानक काही क्षणात त्यांच्या अंगावर वीज पडून जागीच ठार झाले. ही घटना ग्रामस्थांना समजताच ग्रामस्थांनी बापूराव जाधव यांच्या घराकडे धाव घेतली . या घटनेची माहीती शाहुवाडी पोलीस ठाणे व महसुल विभागाला देण्यात आली. पोलीसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह मलकापूर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. वैधकीय अधिकारी यांनी रात्री उशिरा मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. बापूराव जाधव यांच्या पाश्यात पत्नी एक मुलगी असा परिवार आहे .









