बेळगाव : वडगाव-यरमाळ रस्त्यावरील विद्युतखांब कोसळण्याच्या स्थितीत आहेत. मागील आठवड्यात झालेल्या वादळी पावसामुळे विद्युतखांब एका बाजूला कलंडले असून ते केव्हा कोसळतील, याचा नेम नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना धोका निर्माण झाला असून विद्युतखांबांची दुरुस्ती करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. पहिल्याच पावसाने हेस्कॉमची दाणादाण उडविली. अनेक ठिकाणी धोकादायक वीजखांब कोसळले तर काही ठिकाणी विद्युतखांब केव्हा कोसळतील, याची शाश्वती नाही. वडगाव-यरमाळ रस्त्यावर अवचारहट्टी गावानजीक 3 ते 4 खांब एका बाजूला कलंडले आहेत. हे विद्युतखांब कोसळले तर त्यासोबत अजून 7 ते 8 खांब कोसळण्याची शक्यता आहे. असे झाल्यास शेतकरी आणि हेस्कॉमला मोठा फटका बसू शकतो. सध्या पेरणीची कामे पूर्ण झाली असून भाताची उगवणही झाली आहे. त्यामुळे विद्युतखांब कोसळल्यास शेतीचे नुकसान होऊ शकते. रस्त्याशेजारी असणारे विद्युतखांब विरुद्ध दिशेला कोसळले तर वाहनांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या विद्युतखांबांची वेळेत दुरुस्ती करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
Previous Articleडेब्रीसचे ‘डॅमेज’ अलतग्याला नको…
Next Article अखेर आरटीओ इमारत कामाला सुरूवात
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









