राज्याच्या विविध भागात खळबळ : उस्ते, साट्रे, गोळावली येथील नद्या कोरड्या पडण्याची भीती
प्रतिनिधी /वाळपई
कर्नाटक सरकारने पाणी वळविण्याचा निर्णय घेतल्यामुळे या म्हादईसह तालुक्मयातील नद्यावर विपरित परिणाम होऊ लागले आहेत. यामुळे सध्या गोव्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये खळबळ माजली आहे. यामुळे आंदोलनाची धग वाढू लागली आहे.
कर्नाटकच्या कळसा-भांडुरा प्रकल्पामुळे म्हादईचा गळा घोटला जात आहे. मलप्रभेत पाणी वळविण्यासाठी कणकुंबीजवळ कळसा उपनदीचे पात्र उद्ध्वस्त केले. त्यामुळे त्या परिसरातील झरे, नाले, नैसर्गिक जलस्रोत बंद पडले असून गोव्याकडे येणारे पाणी कमी झाल्यामुळे जानेवारी महिन्यातच साटेतील नदी पात्रातील पाणी पातळीत घट होऊ लागली आहे. पाणी कमी झाल्यामुळे सहजपणे चालत नदी पार करता येते. साटे, उस्तेतील उपनद्यांवर परिणाम झाला असून या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या बागायती, शेतीला मोठा फटका बसणार आहे.
कणकुंबीतील कळसा नाला उद्ध्वस्त झाल्यामुळे पावसाळ्यात म्हादईकडे येणारे पाणी कमी झाले असून अद्यापही काही प्रमाणात उलट्या दिशेन पाणी मलप्रभेत जात आहे. त्यामुळे उस्ते, साटेतील नदीत पाणी कमी झाल्याने जानेवारीतच पात्र कोरडे पडले आहे. काही ठिकाणी नद्यांची कोंडी झाली आहेत. गुऊवारी प्रत्यक्ष पाहणी केली असता, अनेक ठिकाणी नदीतील दगड उघडे पडलेले दिसत आहेत. त्यामुळे एप्रिल, मे महिन्यात या परिसरात मोठी पाणी टंचाई जाणवणार आहे. याचा परिणाम थेट बागायती शेतीबरोबरच नदीच्या काठावरील गावांवरही पाणी टंचाईची टांगती तलवार आहे.
बंधाऱ्यांमुळे पाणी दिसते…
सुर्लातून खालच्या बाजूला असलेल्या साटेत पाणीसाठा कमी झाला असून फक्त बंधारा बांधल्यामुळे थोडे पाणी साठलेले दिसते. अन्यथा या ठिकाणी पात्र पूर्ण कोरडे झाले असते. तसेच चिखलीतून येणारे पाणीही कमी झाले आहे. गोळावली रिवे-सुर्लातून पुढे वेळुसच्या नदीतून जल प्रवाह खाली येतो, पण वरच्या भागातील पाणी कमी झाल्याने जानेवारी महिन्यातच येथील पात्रही सुकत चालले आहे.
कर्नाटकने घाटावर कणकुंबी 2 परिसरात केलेल्या कालव्याच्या कामामुळे अलीकडे उस्ते, साट्रे, गोळावली येथील उपनद्यातील पाणी कमी होत आहे. गेल्या पावसाळ्यात धबधबेही नेहमीसारखे दिसले नाहीत. कारण घाटावरून येणारे पाणी कमी झाले. बारामाही वाहणारे नैसर्गिक स्रोतही कमी झाले आहेत.
‘कळसा’चे पाणी गोव्याकडे येणे गरजचे!
उलट्या दिशेने मलप्रभा नदीकडे कळसा उपनदी व परिसरातील वळवलेले पाणी पूर्वीप्रमाणे गोव्यात यायलाच हवे. तरच साटे, उस्तेतील नदीत पाणी कायम राहणार आहेत. अन्यथा: तो जानेवारीपासूनच बंद होणार आहे. हे संकट टाळण्यासाठी येत्या पावसाळ्यापूर्वी कळसाचे पाणी पूर्ववत गोव्याकडे येणे गरजेचे आहे. त्यासाठी शासनाने शक्मय ते सर्व प्रयत्न केले पाहिजेत, असे मत साटे, सत्तरीतील शेतकऱ्यांचे आहे.









