बेळगाव : काकतीवेस रोड परिसरात सध्या भूमिगत जलवाहिनी घालण्याचे काम सुरू आहे. यासाठी खोदाई करण्यात आली असून उडणाऱ्या धुळीमुळे व्यापाऱ्यांचा व्यवसाय मंदावला आहे. विशेषत: खाद्य पदार्थ, भाजीपाला, चिकन, मटण दुकानदारांना याचा सर्वाधिक फटका बसत असून ग्राहक फिरकत नसल्याची तक्रार स्थानिक व्यापाऱ्यांनी केली आहे. शहरात सर्वत्र धुळीचा त्रास सहन करावा लागत असतानाच आता काकतीवेस रोड येथेही प्रचंड धुळीचे साम्राज्य पसरले आहे. खोदाईची माती बाजुला टाकाली असून त्याची धूळ उडत आहे. बरेच दिवस काकतीवेस येथील खोदाईचे काम सुरू असल्याने स्थानिक व्यापारी वैतागले आहेत. या परिसरात अनेक फूडस स्टॉल व हॉटेल्स आहेत. धुळीचे कण उडत असल्याने या हॉटेलचालकांचा व्यवसाय ठप्प झाला आहे. तसेच भाजी विक्रीलाही फटका बसला आहे. काही दुकानदारांनी प्लास्टिकची आवरणे घातली आहेत. तरीदेखील धुळीचे प्रमाण कमी झाले नसल्याने काम लवकर पूर्ण करावेत, अशी मागणी विक्रेत्यांमधून केली जात आहे.
Previous Articleतीन मोकाट जनावरांची रवानगी गोशाळेत
Next Article सीमाहद्दीवर हत्तीचा मुक्काम वाढला!
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









