बेळगाव : महावीरनगर, मारुतीनगर येथे आमदार राजू सेठ यांच्या प्रयत्नातून 135 कुटुंबांना पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली. यापूर्वी पाण्याची सोय नसल्याने उन्हाळ्याच्या दिवसात पाण्यासाठी वणवण करावी लागत होती. याची कल्पना आमदारांना दिल्यानंतर त्यांनी तातडीने या ठिकाणी पाण्याची सोय उपलब्ध करून दिली. यावेळी आमदार राजू सेठ यांनी एलअॅण्डटी व पाणीपुरवठा मंडळाच्या अधिकाऱ्यांचे कौतुक केले. या कार्यक्रमाला अमन सेठ, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक बुरकुले, साहाय्यक कार्यकारी अभियंता विजयानंद सोलापूर, सौम्या, एलअॅण्डटी कंपनीचे व्यवस्थापक धीरज अभयकर, रवीकुमार, रेवणसिद्धप्पा, इब्राहिम यांच्यासह इतर उपस्थित होते.
Previous Articleदर्शनचा साथीदार प्रदोषला बेंगळूरला हलवले
Next Article प्रवाशांचे दागिने पळविणाऱ्या त्रिकुटाला अटक
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









