Satara : सातारा जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार अगर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून महाराष्ट्र पोलीस अधिनियममानुसार आजपासून 3 सप्टेंबरपर्यत शस्त्र व जमावबंदी आदेश प्रभारी जिल्हादंडाधिकारी जीवन गलांडे यांनी जारी केला आहे.
हा आदेश यात्रा,धार्मिक कार्य,लग्न विधी कार्य,अंत्यविधी कार्य तसेच ज्या लोकांना शांततेच्या मार्गाने एकत्र जमून कोणताही कार्यक्रम साजरा करावयाचा असेल त्याचवेळी पोलीस अधीक्षक,संबंधित उपविभागीय पोलीस अधिकार, तसेच संबंधित पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरिक्षक यांची आगावू परवानगी घेतली असेल तर त्यांना सदरचा आदेश लागू होणार नाही,असे आदेशात नमूद आहे.









