बेळगाव : वैभवनगर येथील सत्यसाई कॉलनीतील रहिवाशांना घरांच्या हक्कपत्रांचे वितरण करण्यात आले. परिसरातील 160 हून अधिक कुटुंबांना आमदार राजू सेठ यांच्या हस्ते हक्कपत्र देण्यात आले. त्यामुळे मागील 20 वर्षांपासून झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांना घरांचे हक्क मिळाले आहेत. वैभवनगर परिसरात मागील 20 ते 25 वर्षांपासून अनेक कुटुंबे रहात आहेत. झोपडपट्टीतील नागरिकांची महानगरपालिकेकडे नोंद नसल्यामुळे त्यांना कोणत्याही सुविधा उपलब्ध होत नव्हत्या. यासंदर्भात आमदार राजू सेठ यांनी पुढाकार घेऊन त्यांना हक्कपत्रे देण्यासाठी मदत केली आहे. एकूण 160 कुटुंबांना सोमवारी हक्कपत्रे देण्यात आली. यावेळी अमन सेठ, झोपडपट्टी निर्मूलन बोर्डचे साहाय्यक कार्यकारी अभियंता प्रतीक दळवाई, विनय यांच्यासह सत्यसाई कमिटीचे सदस्य उपस्थित होते.
Previous Articleमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नीची यल्लम्मा डोंगराला भेट
Next Article सीबीटी बस स्थानक उद्घाटनाच्या प्रतीक्षेत
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









