वाळपई : केंद्र सरकारने नऊ वर्षात केलेले कार्य जनतेच्या प्रत्येक दारापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. यासाठी माहिती पुस्तकांचे घरोघरी वितरण सुरू करण्यात आलेले आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे व केंद्र सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी सहकार्य करावी अशी विनंती पर्ये मतदार संघाच्या आमदार डॉ. देविया राणे यांनी केले आहे. पर्ये मतदार संघामध्ये घरोघरी पुस्तिका वितरणाच्या कार्यक्रमाला सुऊवात करण्यात आलेली आहे .याचा शुभारंभ ठाणे पंचायत क्षेत्रातून करण्यात आला. आमदार डॉ. देविया राणे स्वत: अनेक घरांमध्ये फिरून यासंदर्भाच्या पुस्तिकेचे वितरण केले. त्यानंतर पत्रकाराची बोलताना त्यांनी सांगितले की सत्तरी तालुक्यातील जनतेने आतापर्यंत भाजपाला चांगल्या प्रकारचे सहकार्य केलेले आहे. यामुळे विकासाला चांगल्या प्रकारे चालना मिळत आहे. येण्राया काळात भाजपाच्या मागे खंबीरपणे उभे राहून पुन्हा एकदा सत्तरी तालुक्यातील जनतेची ताकद दाखवून द्या अशी विनंती यावेळी त्यांनी केली. केंद्र सरकारने केलेल्या विकासाची पुस्तिका प्रत्येकाच्या दारापर्यंत जाणे गरजेचे आहे .यासाठी अशा उपक्रमांच्या आयोजन करण्यात आल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत केरी जिल्हा पंचायत सभासद देवयानी गावस, ठाणे पंचायतीच्या सरपंच सरिता गावकर उपसरपंच तनया गावकर पंच सभासद सोनिया गावकर, अनुष्का गावकर विनायक गावस, सुरेश आयकर सुभाष गावडे व इतरांची उपस्थिती होती. सुऊवातीला ठाणे गावचे ग्रामदैवत मंडळगिरो व कोळगिरो या देवस्थानचे दर्शन घेऊन घरोघरी माहिती पुस्तिकेच्या वितरणाचे सुऊवात करण्यात आली. ठाणे भागामध्ये अनेक प्रकारच्या सार्वजनिक स्वरूपाच्या योजना कार्यान्वित होणे गरजेचे आहे. या संदर्भातील त्यांनी अनेक स्तरावर नागरिकांची चर्चा केली.
Previous Articleगुरुजनांचा आदर हेच आपल्या यशाचे आणि किर्तीचे गमक
Next Article गोव्याला दुसरे मणिपूर बनवू नका
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









