खानापूर : खानापूर तालुका म. ए. समितीच्यावतीने 17 जानेवारी रोजी हुतात्मा दिन गांभीर्याने पाळण्यात येऊन सकाळी 8.30 वाजता खानापूर स्टेशनरोड येथील हुतात्म्यांना अभिवादन करण्यात येणार आहे. यासाठी तालुक्यात गावोगावी पत्रके वाटण्यात येत आहेत. तालुक्यातील रुमेवाडी, करंबळ, कौंदल, हेब्बाळ, जळगे, लालवाडी, कारलगा, नंदगड, कसबा नंदगड, हलगा, माचीगड, शिवोली, चापगाव आदी गावात जाऊन पत्रके वाटून जनजागृती करण्यात आली. तसेच रविवारी खानापूर बाजारपेठेतही हुतात्मा दिनाच्या आचरणाबाबत पत्रके वाटून अभिवादनाच्या कार्यक्रमास उपस्थित राहण्यासंदर्भात आवाहन करण्यात आले. यावेळी खानापूर तालुका समिती अध्यक्ष गोपाळराव देसाई, कार्याध्यक्ष निरंजन सरदेसाई, आबासाहेब दळवी, राजाराम देसाई, डी. एम. भोसले, बाळासाहेब देसाई, परशराम गुरव, विठ्ठल गुरव, गोपाळ मादार, हणमंत गावकर, परशराम मेश्राम, रामचंद्र देसाई, रवळू फठाण, सिताराम बेडरे, महादेव घाडी, मोहन गुरव, नागेश भोसले, प्रवीण पाटील, रमेश धबाले, अमित बेळगावकर, पांडुरंग पाटील, उदय पाटील, मारुती पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते.
Previous Articleधोकादायक ऊस वाहतुकीला शिस्त लावावी
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









