खानापूर : खानापूर अबकारी विभागात पकडण्यात आलेल्या 1 कोटी 40 लाख रुपयाच्या मद्याची गुरुवारी खानापूरजवळील होनकल येथे विल्हेवाट लावण्यात आली. याबाबत माहिती देताना बेळगाव अबकारी खात्याचे उपायुक्त एम. वनजांक्षी यांनी सांगितले की, जानेवारी 23 ते डिसेंबर 23 पर्यंत खानापूर विभागात अबकारी खात्याकडून बेकायदा वाहतूक होत असलेल्या गोवा बनावटीचे मद्य जप्त करण्यात आले होते. हे मद्य दहा हजार लिटर असून या मद्याची किंमत 1 कोटी 40 लाख आहे. अबकारी खात्याच्या निर्देशानुसार या मद्याची विल्हेवाट लावणे गरजेचे होते. त्या अनुषंगाने अबकारी खात्यातर्फे ही कारवाई हाती घेण्यात आली. या मद्याची विल्हेवाट लावताना पर्यावरणाची कोणतीही हानी होणार नाही. याची पूर्णपणे काळजी घेण्यात आली आहे. विल्हेवाट लावल्यानंतर मद्याच्या रिकामी बाटल्या आणि इतर साहित्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. या मद्याची विल्हेवाट लावण्याच्या प्रक्रियेत उपअधीक्षक रवी मुरगोड, प्राणेश कागवाड, मल्लेश उप्पार, निरीक्षक रवी होसळळी, उपनिरीक्षक मल्लाप्पा निलजकर यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
Previous Articleगोरगरिबांना वैद्यकीय उपचारांसाठीच रेशनकार्डची सोय
Next Article आमदारांचा अवमान करणाऱ्या वनाधिकाऱ्यांवर कारवाई करा
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









