काणकोण : गोव्याच्या आरजी पक्षाने येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिने तयारी चालविली असून आमदार विरेश बोरकर, गत विधान सभा निवडणुकीचे काणकोणचे उमेदवार प्रशांत पागी आणि अन्य कार्यकर्त्यांनी काणकोण मतदारसंघातील विविध समस्यांवर चर्चा केली. काणकोणात वीज, पाणी आणि आरोग्याची समस्या सतत भेडसावत आहे. वारंवार वीज पुरवठा खंडित होणे ही नित्याचीच बाब झालेली आहे. मूलभूत गरजांपासून या भागातील नागरीक अजूनही वंचित आहे. ज्या भागातील नागरीकांनी गोवा मुक्तीसाठी आपले बलिदान दिले त्या थाळणी सारख्या भागात अजूनही जायला व्यवस्थित रस्ता नाही, पदपूलाची मागणी विचारात घेण्यात येत नाही. गावणे धरण तयार होऊन देखील त्या धरणाचा वापर पिण्यासाठी केला जात नाही. श्रीस्थळ काणकोण येथील औद्यागिक वसाहतीला भकास असे स्वरूप प्राप्त झाले आहे. 27 पेक्षा अधिक शेड्स असताना त्या ठिकाणी उद्योग व्यवसायाला चालना दिली जात नसल्यामुळे या ठिकाणी बेकारीची समस्या भेडसावत आहे. या संबधी स्थानिक नागरीकांशी चर्चा करण्यात येणार असून सरकारी दरबारी या समस्या मांडण्याच्या दृष्टिने आरजी पक्ष लक्ष देणार असल्याचे मत आमदार विरेश बोरकर यांनी या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले. काणकोण मतदारसंघातील पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची नुकतीच बैठक घेण्यात आली व या सर्व गंभीर विषयांवर चर्चा करण्यात आल्याचे श्री. बोरकर यानी स्पष्ट केले.
Previous Articleमाशेल भागात केबल वायर्स रस्त्यावर
Next Article काणकोणात सतत खंडित वीज पुरवठा
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









