पणजी : संयुक्त वीज नियामक आयोगाच्या (जेईआरसी) जनसुनावणीदरम्यान जनतेने विचारलेल्या प्रश्नांना आपण 2 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्य विधानसभा अधिवेशनात सक्षमपणे उत्तर देऊ, असे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी सांगितले. मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना वीजमंत्री ढवळीकर म्हणाले, विद्यमान भाजप सरकार हे जनतेला सोयी-सुविधा देण्यासाठी तत्पर आहे. नागरिकांना अडचणीत टाकण्यासाठी आम्ही कोणतीही भूमिका घेतलेली नाही. राज्यात सध्या 3,500 कोटी ऊपयांची कामे सुरू आहेत, तर 2500 कोटी ऊपयांची कामे पुढील वर्षी नियोजित आहेत, असे ते म्हणाले. 8 आणि 9 जानेवारी रोजी उत्तर आणि दक्षिण गोव्यात प्रस्तावित वीजदरवाढीबाबत जनसुनावणी आयोजित करण्यात आली होती. दोन्ही जिह्यातील नागरिकांनी दरवाढीला कडाडून विरोध केला आहे. केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या निर्देशानुसार राज्याने विद्युत मीटरच्या जागी स्मार्ट मीटरसाठी सल्लागाराची नियुक्ती केली असल्याची माहितीही ढवळीकर यांनी दिली. या कामासाठी 2 ते 3 वर्षे लागतील, अशी माहिती त्यांनी दिली.
Previous Article‘थेट विधानसभा निवडणुकीत भेटा’
Next Article बळकावलेल्या जमिनी सरकार परत घेणार
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









