(भाग-2)
मागच्या लेखात म्हटल्याप्रमाणे डिप्रेशनच्या अनेक केसेस सातत्याने पहायला मिळतात. त्याचे वाढते प्रमाण विचार करायला लावणारे आहे. लेखाच्या मागच्या भागात आपण डिप्रेशन म्हणजे काय त्याचे प्रकार समजून घेतले. खरंतर ज्यावेळी डिप्रेशन सौम्य प्रमाणात असते त्यावेळी केवळ समुपदेशनानेही त्यावर मात करता येते.
? समुपदेशनामध्ये विचारशैलीत बदल कसा घडवून आणायचा, भावनांना आवर घालण्यासाठी काय करायचे हे शिकविले जाते.
? डिप्रेशन मध्यम वा तीव्र असेल तर औषधोपचारांना पर्याय नसतो. मेंदूत उद्भवलेला जैवरासायनिक असमतोल औषधांनी घालवता येतो. काहीवेळा समुपदेशन व मानसोपचारांची जोड देऊनही समस्या सोडविण्यास मदत केली जाते.
? योग, ध्यान अर्थात लक्ष देण्याचे कौशल्य विकसित करणे, विचार भावनांची सजगता यासाठी सजगतेची तंत्रे शिकविणे, वर्तन उपचारांच्या माध्यमातून इष्ट वर्तन शिकवणे आदी अनेक थेरेपींची मदत घेतली जाऊ शकते.
केव्हा ना केव्हातरी प्रत्येकाच्या आयुष्यात निराशा येत असते. आपल्या मनाची ताकद वापरूनही आपण त्यावर मात करू शकतो. परंतु त्यासाठी काही गोष्टी आवर्जून लक्षात घेणे आणि त्याबाबत सुऊवातीपासूनच प्रत्येकानेच सजग असणे गरजेचे आहे.
आपण आपल्या शरीराची काळजी घेतो. ते सुंदर रहावे म्हणून धडपडतो. तसेच मन सुंदर रहावे, निरोगी रहावे म्हणून प्रत्येकाने दररोज मनाच्या स्वच्छतेकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
डिप्रेशनमध्ये आढळणाऱ्या मुख्य तीन भावना-
? होपलेसनेस-
अगदी निराश वाटणे, कशातच काही रस न वाटणे.
? हेल्पलेसनेस-
हतबलता जाणवणे
? वर्थलेसनेस-
स्वत:ची काही किंमत नाही असे वाटणे.
सामान्यत: डिप्रेशनची आढळणारी लक्षणे-
? उदास भावना हा या मनोवृत्तीचा केंद्रबिंदू आहे. बऱ्याचदा निराश वा उदास वाटणे
? आत्मविश्वास ढळणे, कमीपणा वाटणे
? मनोरंजनाचा आस्वाद न घेता येणे, नीरस वाटणे
? उदास मूड सोबतच चिडचिड, काळजी, अनाठायी चिंता, क्वचित मंत्रचळेपणा (ऑबसेशन) ही लक्षणेदेखील आढळतात.
? निद्रानाश, शारीरिक हालचाली मंदावणे
? भूक कमी लागणे वा अती लागणे
? सतत थकवा वाटणे
? एकाग्रता कमी होणे, चटकन निर्णय न घेता येणे.
?स्वत:बद्दल कमीपणाची, हीनपणाची, अपराधीपणाची भावना वाटणे
? आत्महत्येचा विचार किंवा प्रयत्न
? काहीवेळा सतत डोकेदुखी, पोटदुखी अशा शारीरिक तक्रारी जाणवतात पण त्यामागे नैराश्य दडलेले असू शकते.
? काही ऊग्णांना अशा नैराश्याबरोबर कानामध्ये आवाजाचे भास होणे, भास
भ्रमाची लक्षणेही आढळू शकतात. ही लक्षणे ‘सायकॉटिक’ म्हणजे वास्तवाशी सुसंगत नसतात या प्रकाराला ‘सायकॉटिक डिप्रेशन’ असेही म्हणतात. (हा डिप्रेशनचा प्रकार अधिक तीव्र असतो. आत्महत्येचा अधिक धोका असतो)
काही गैरसमज-
? सुख बोचते म्हणून डिप्रेशन येते.
? डिप्रेशन हा एक मानसिक आजार आहे हे लक्षात घ्यायला हवे. जसे आपण शारीरिक आजारावर त्याच्या तीव्रतेनुसार उपचार करतो तसेच त्याच्या तीव्रतेनुसार त्या त्या पद्धतीने यावरही उपचार घ्यावे लागतात.
? एकदा डॉक्टरांकडे गेलो की आयुष्यभर औषधे पाठ सोडत नाहीत.
? बहुतांश वेळा समुपदेशन आणि सौम्य स्वऊपाचा उपचार नीट घेतल्यास सहा महिन्यात यातून बाहेर पडता येऊ शकते.
? गर्जेल तो पडेल काय….या प्रकारे आत्महत्येचा इशारा देणारा माणूस कधीच आत्महत्या करत नाही.?
? खरंतर ज्यावेळी असे एखादी व्यक्ती बोलत असेल त्यावेळी दुर्लक्ष न करता तिच्या मनातली खळबळ समजून घेणे. ‘मी आहे’ हा आश्वस्त भाव निर्माण करणे आणि त्या तीव्रतेनुसार तिला उपचारांसाठी तयार करणे गरजेचे आहे.
? ताणतणावाखाली असलेल्या व्यक्तीजवळ आत्महत्येविषयी बोलल्यास त्या व्यक्तीच्या मनात आपण आत्महत्येचा विचार भरवितो. उलट जी व्यक्ती तणावाखाली असेल त्या व्यक्तीला योग्य रीतीने प्रŽ विचारून मन मोकळे करण्यासाठी संधीच दिली जाते. तिच्या मनात येणाऱ्या भावना, विचार कळल्यास समुपदेशनाची, उपचारांची दिशा ठरविता येते.
डिप्रेशनच्या दिशेने वाटचाल होऊ नये म्हणून खबरदारीचे उपाय-
- भावनिक मोजपट्ठी तयार करणे-
अशी भावनिक मोजपट्टी आपणच तयार करायची. यातील शून्य ही स्थिती (वाईटही नाही आणि चांगलेही नाही) अर्थात बॅलन्स स्थिती दर्शविते. यातील अधिक अंकाची बाजू ही किती चांगले वाटते आहे याकडे जाणारी आणि वजा अंकाची बाजू ही नकारात्मक विचार-भावना येणे, उदास वाटणे या गोष्टी दर्शविणारी आहे. अशी मोजपट्टी तयार करून रोज मनात डोकावून पहायचे आणि आपली तुलना आपल्यासोबतच नोंद करायची. कधीतरी उदास वाटणे, मूड नसणे, काही नकारात्मक भावना, विचार येणे हे अगदी नैसर्गिक आहे. म्हणजेच त्याची तीव्रता पाहता -1 ,-2 ही स्केल नैसर्गिक आहे. उदा. एखादा अपघात पाहिला की थोडी काळजी वाटणे स्वाभाविक आहे. असे आपल्याबाबतीत झाले तर हा विचार येऊ शकतो. आपण समजा -1 या पट्टीवर आहोत..ओके. परंतु त्या विचाराची, काळजीच्या भावनेची तीव्रता, वारंवारता, कालावधी हे वाढत जात नाही ना याकडे लक्ष हवे. म्हणजे बाप रे अपघात पाहिला. मला किंवा माझ्या घरच्यांना अपघात होईल का हा? असे झाले तर? असे विचार वारंवार मनात यायला लागले आणि त्याचे चिंतेत ऊपांतर होऊ लागले तर आपण -3,-4 या स्केलवर जातो आहोत. ते कमी करण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्याची जाणीव आणि वेळीच घेतलेली खबरदारी यामुळे सतत वजा बाजूला राहणे म्हणजेच औदसिन्याच्या दिशेने होणारा प्रवास टाळता येईल. याविषयी अधिक जाणून घेऊया पुढील भागात…
-अॅड.सुमेधा संजीव देसाई








