बेळगाव : आदर्श विद्यामंदिर शाळेच्या मागे आणि आदर्शनगर-हिंदवाडी रस्त्यावर असलेल्या एका मोठ्या दगडामुळे गल्लीत वारंवार लहान-मोठे अपघात घडत आहेत. सदर दगड हटविण्यासंदर्भात महापालिकेकडे अनेकवेळा विनंती केली असली तरीही सदर दगड हटविण्यात आलेला नाही. त्यामुळे मनपाने याची दखल घेत धोकादायक दगड हटवावा, अशी मागणी रहिवाशांतून केली जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आदर्शनगर-हिंदवाडी येथे रस्त्याच्या बाजूला मोठा दगड आहे. त्यामुळे वाहनांचे लहान-मोठे अपघात तसेच रात्रीच्यावेळी सदर दगडावर बसून मद्यपान करणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. एखादे चारचाकी वाहन गल्लीत उभे केल्यास अन्य वाहनांना ये-जा करण्यास अवघड होत आहे. त्यामुळे दगड हटविण्यासंदर्भात यापूर्वी अनेकवेळा महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार करण्यात आली आहे. पण लोकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. भविष्यात सदर दगडामुळे एखादी मोठी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण? असा सवाल रहिवाशांतून उपस्थित केला जात आहे.
Previous Articleवैद्यकीय, तांत्रिक उच्चशिक्षण प्रवेशाची मुदत वाढवून द्या
Next Article एटीएम दरोडाप्रकरणी चौघांना अटक
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









