बेळगाव : ग्रामीण भागात विद्युत प्रतिनिधी म्हणून मागील अनेक वषर्पांसून सेवा देणाऱ्या कामगारांकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष झाले आहे. 2003 पासून आजतागायत हे कामगार ग्रामीण भागात जाऊन मीटर रिडिंग तसेच बिल जमा करण्याचे काम करीत आहेत. परंतु, राज्य सरकारने या कामगारांना कायमस्वरुपी नोकरीत सामावून घेतले नसल्याने या कामगारांवर अन्याय झाला आहे. या विरोधात बुधवारी सुवर्ण विधानसौधसमोर आंदोलन करून नोकरीत सामावून घ्या, अशी मागणी अखिल कर्नाटक ग्राम विद्युत प्रतिनिधी कल्याण संघाच्यावतीने करण्यात आली. ग्रामीण भागात घरोघरी जाऊन विद्युत मीटरचे रिडिंग घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोकरीत सामावून घ्या, यासाठी मागील अनेक वर्षांपासून आंदोलन सुरू आहे. 2020 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने सर्व कामगारांना कायमस्वरुपी करण्याचे निर्देश दिले असतानाही राज्य सरकार मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे ग्राम विद्युत प्रतिनिधींना कंत्राटदाराकडून दिल्या जाणाऱ्या वेतनातच काम करावे लागत आहे. अनेकवेळा आंदोलने करून देखील नोकरीत सामावून घेतले नसल्याचे यावेळी सांगण्यात आले. या आंदोलनामध्ये बेळगाव, विजापूर, धारवाड, गदग यासह राज्यभरातील ग्राम विद्युत कर्मचारी सहभागी झाले होते.
Previous Articleखानापूर तालुक्याला आर्थिक संकटातून बाहेर काढणे गरजेचे
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









