बेळगाव : सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांवर एका वकिलाने सुनावणी सुरू असताना न्यायालयातच हल्ला करण्याचा प्रयत्न केला. न्याय देणारे न्यायाधीशच जर न्यायालयात सुरक्षित नसतील तर हल्लेखोरांमध्ये अभय निर्माण होईल. यामुळे सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या संबंधित वकिलाला त्वरित अटक करून त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी राज्य दलित संघर्ष समितीच्यावतीने करण्यात आली. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. समाजात अशाप्रकारच्या वाईट प्रवृत्तींमध्ये वाढ होत चालली आहे. तसेच समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचेही प्रमाण वाढले आहे. सरन्यायाधीशांवरही अशाच प्रवृत्तीतून वकिलाने हल्ला केला आहे. जर वाईट प्रवृत्तींवर आळा घालावयाचा असेल तर त्यांच्यावर वेळीच कारवाई करण्याची गरज आहे. तसेच असे कृत्य करताना यासाठी सदर वकिलाला अटक करून अशी कृती करणाऱ्यांना भीती वाटेल, अशी कठोर शिक्षा करण्याची मागणीही करण्यात आली.
Previous Article‘अन्नभाग्य’मधून इंदिरा आहार किट
Next Article ‘त्या’ हल्ल्याचा बेळगाव बार असोसिएशनकडून निषेध
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









