वार्ताहर/जांबोटी
दारोळी-कोकणवाडा गावादरम्यान असलेल्या संपर्क रस्त्यावरील कारगिळी नाल्यावर पुलवजा बंधारा बांधावा व या संपर्क रस्त्याचे खडीकरण करावे अशी मागणी या परिसरातील जनतेमधून होत आहे. निलावडे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील दारोळी व कोकणवाडा गावच्या संपर्क रस्त्यावरील कारगिळी नाल्यावर पूल नसल्यामुळे पुलाअभावी या परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. दारोळी व कोकणवाडा हे अंतर सुमारे दोन किलोमीटर आहे. या दोन्ही गावच्या मधोमध कारगिळी नाला वाहत असल्यामुळे पावसाळ्यात व उन्हाळ्dयाच्या दिवसात देखील दारोळी, कोकणवाडा, निलावडे, मुगवडे, हरिजन केरी आधी गावच्या नागरिकांची मोठ्या प्रमाणात पुलाअभावी गैरसोय होते. सध्या या दोन्ही गावा दरम्यान शेतवडीतून कच्चा रस्ता वजा पायवाट अस्तित्वात आहे. नागरिकना ये-जा करण्यासाठी या नाल्यावर पुल अथवा साकवाची देखील सुविधा उपलब्ध नाही. या नाल्यावर बारमाही पाणी असले तरी उन्हाळ्dयात नागरिक या नाल्यातून दुचाकीवरून प्रवास करतात. मात्र पावसाळ्dयात जून महिन्यापासून हा नाला दुथडी भरून वाहत असल्यामुळे दोन्ही गावचा संपर्क तुटतो.
दारोळी गावच्या नागरिकांना पावसाळ्dयात निलावडे या ग्रामपंचायतच्या ठिकाणी संपर्क साधण्यासाठी दारोळी -मुघवडे फाटा निलावडे असा दहा ते बारा किलोमीटर वळसा घालून प्रवास करावा लागत असल्याने मोठी गैरसोय होते. तसेच या भागातील असंख्य शेतकऱ्यांची नाल्याच्या दोन्ही बाजूला शेती असल्यामुळे पावसाळ्dयात नाला पार करून जनावरे तसेच शेतकी अवजारांची ने-आण करण्यासाठी जीव धोक्यात घालून नाल्यातून ये जा करावी लागते. यामुळे शेतकरी वर्गाच्या जीविताला धोका उदभवतो. यासाठी दारोळी-कोकणवाडा दरम्यानच्या कारगिळी नाल्यावर पूल बांधून गावकऱ्यांना बारमाही रस्त्याची सुविधा करून गैरसोय दूर करावी अशी मागणी होत आहे. आमदार विठ्ठल हलगेकर तसेच खानापूर जि. पं. उपविभागीय कार्यकारी अभियंत्यांनी लक्ष घालून दारोळी-कोकणवाडा रस्त्यावरील कारगिळी नाल्यावर पूल बांधकाम मंजुरीचा पाठपुरावा करून पूल व रस्त्याच्या कामाला चालना द्यावी अशी मागणी होत आहे.









