खानापूर : हलशी परिसरात जंगली डुक्करांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला असून भात कापणीनंतर शिवारात घेण्यात आलेल्या भातगंजीचे जंगली डुक्करांकडून मोठ्या प्रमाणात नुकसान सुरू झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली असून सोमवारी रात्री विनायक देसाई यांच्या शेतातील दोन भात गंजींचे डुक्करांनी नुकसान केले आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. हलशीवाडी, गुंडपी, हलशी आदी भागात जंगली प्राण्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून जंगली डुक्करांच्या कळपाकडून शेतकऱ्यांच्या भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले जात असून भातकापणी झाल्यानंतर मळणीसाठी अनेकांनी भाताच्या गंज्या रचून भात ठेवण्यात आले आहे. मात्र जंगली डुक्करांच्या कळपाकडून भातगंज्या विस्कटून भाताचा फडशा पाडण्यात येत आहे. विनायक देसाई यांच्या शेतातील भातगंजीच्या नुकसानीची माहिती वनविभागाला देण्यात आल्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी नुकसानीची पाहणी करून माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविली आहे. सातत्याने जंगली प्राण्यांकडून शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. मात्र वनखात्याकडून कोणतीही उपायोजना करण्यात येत नसल्याने शेतकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
Previous Articleखानापूर नगरपंचायतीच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा
Next Article भीमगड अभयारण्यातील गावांना वनमंत्र्यांची भेट
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









