बेळगाव : संततधार पावसामुळे शहर उपनगर व ग्रामीण भागात जुनाट घरांची पडझड सुरूच आहे. नुकतेच समर्थ गल्ली कणबर्गी येथील टोपाण्णा अष्टेकर आणि रेणुका अष्टेकर राहत असलेल्या घराची भिंत कोसळल्याने कुटुंबीयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे तलाठी व संबंधित अधिकाऱ्यांनी भेट देऊन आर्थिक नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी केली जात आहे. टोपाण्णा अष्टेकर आणि रेणुका सिद्धाप्पा अष्टेकर यांचे समर्थ गल्ली कणबर्गी येथे घर आहे. मात्र गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे घराची भिंत भिजत होती. त्यामुळे गुरुवारी रात्री सदर भिंत कोसळल्याने मोठे नुकसान झाले आहे. सामाजिक कार्यकर्ते किसन सुंठकर यांनी ही माहिती तलाठ्यांना देऊन नुकसान भरपाई देण्याची विनंती केली आहे.
Previous Articleगटारीअभावी कणबर्गीत रस्त्यावर पाणी तुंबण्याचे प्रकार
Next Article कारवार जिल्ह्याच्या किनारपट्टीवर पावसाचे थैमान
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









