बेळगाव : काही दिवसांपूर्वी सरन्यायाधीशांवर एका वकिलाने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. यामुळे न्याय देणारे न्यायाधीशच सुरक्षित नसून, ही बाब खरोखरच गंभीर आहे. सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या सदर वकिलाला अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी दलित संघर्ष समितीच्यावतीने करण्यात आली. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाला न मानणारे अनेक लोक आहेत. सदर वकिलाने याच मानसिकतेतून हल्ला केल्याने त्याने संविधानाचे उल्लंघन केले आहे. या हल्ल्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत आहोत. हल्लेखोर वकिलाला त्वरित अटक करून त्याच्यावर पुन्हा न्यायालयात अशाप्रकारच्या घटना घडू नयेत, अशाप्रकारची कठोर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली. यावेळी श्रीकांत मादर, बसवराज कट्टीमनी, बाळव्वा हरिजन, मिलिंद ऐहोळे, लक्ष्मी किळ्ळी यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
Next Article हल्लेखोर वकिलावर कारवाईसाठी विविध संघटनांचा मोर्चा
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









