बेळगाव : न्यायमूर्ती नागमोहन दास यांच्या अध्यक्षतेखाली अंतर्गत आरक्षणात एक सदस्सीय चौकशी आयोगाने 4 ऑगस्ट रोजी सरकारला सादर केलेल्या अहवालात अनुसूचित जाती व इतर मागास समुदायाला योग्य आरक्षण मिळाले नसल्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी कर्नाटक दलित संघर्ष समितीतर्फे राणी चन्नम्मा चौकात मानवी साखळी करून निदर्शने केली. त्यानंतर मोर्चाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. तत्पूर्वी कर्नाटक दलित संघर्ष समितीच्या नेतृत्त्वाखाली विविध दलित संघटनांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानापासून चन्नम्मा सर्कलपर्यंत मोर्चा काढला. त्यानंतर मानवी साखळी करून घोषणाबाजी केली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. मोर्चात मोठ्या संख्येने दलित बांधव सहभागी झाले होते. न्यायासाठी लढा चलवादींना न्याय द्या, अशा घोषणा दिल्या. अहवालात चलवादी व इतर मागास समुदायाच्या लोकांना आरक्षण दिले गेले नाही ही बाब अत्यंत वेदनादायी आहे. त्यामुळे सरकारने तातडीने हे असंतुलन दूर करावे, अशी मागणी केली. मोर्चात जिल्हा मुख्य संचालक महांतेश तलवार, राज्य खजिनदार सिद्धाप्पा कांबळे, तालुका प्रधान संचालक कृष्णा कोलकार, मल्लेश चौगुले, सिद्धाप्पा कांबळे, कामशेट्टी, राम शेट्टी, जीवन कुरणे, नागराज कोलकारसह दलित बांधव होते.
Previous Articleइमारतींना 21 मीटरपर्यंत एफएसआय द्या
Next Article विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









